पोस्ट्स

स्पर्श होता तुझा....

स्पर्श होता तुझा….                    “काय गं, अशी खो खो खेळायला बसल्यासारखी का बसली आहेस तिथं? काय बघणं चालू आहे खाली?”            “काही नाही अरे, फिरता फिरता ही लाजाळूची फुलं दिसली, त्यांना बघता बघता या पानांशी बसले आपली खेळत. सगळी पानं मिटवली आहेत मी माझ्या बोटाच्या अलवार स्पर्शाने. आता ती परत कधी उघडतील याची वाट बघतेय. मिटताना जशी पटकन मिटतात; तशीच उघडताना पटकन उघडतात की हळूहळू ते बघायचंय. हसू नकोस… तू काय म्हणणार आहेस ते कळलंय मला. हेच ना की गुगलवर लगेच कळेल म्हणून. यामागचं शास्त्र माहीत आहे रे मलाही. पण तुला सांगू… अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, मला जाणूनबुजून परत परत अज्ञानी व्हायला आवडतं. प्रत्येकवेळी हे झाड निरखताना वेगळाच आनंद मिळत जातो. आता हेच बघ की… आपल्याला चंद्रावरचे दऱ्या डोंगर, त्यांची नाव माहित असली तरी त्याच्यावरचा तो कल्पनेतला ससा बघण्यातच मजा वाटते की नई. म्हणून सगळं माहित असूनदेखील मी लाजाळूला स्पर्श करुन लाजायला लावते...

पुस्तक परिचय... ज्ञानसूर्याची सावली

          “मुक्ते, अगं हे भलतंच काय करते आहेस. दही-साखर त्याच्या हातावर घालतात, ज्यानं लवकर यावं असं वाटतं. मुक्ते, मी समाधी घ्यायला चाललोय, सरपण आणायला नाही. हे दही-साखर माझ्या हातावर घालायला कशाला आणलंस? वेडी कुठली.” मुक्ता हातात दह्याची वाटी घेऊन तशीच उभी होती. डोळ्यातून ओघळणारं पाणी तसंच वाहू देत मुक्ता म्हणाली, “सोपानदादा, दही-साखर मी आणलंय तुझ्यासाठी हे खरं! पण ते तुझ्या हातावर घालण्यासाठी नाही. दादा, तू संजीवन समाधी घेण्यासाठी निघाला आहेस, हे मला माहित आहे. हे दही-साखर तू माझ्या हातावर घालायचं आहेस. म्हणजे मी… मी लवकर तुमच्याकडे, म्हणजे ज्ञानादादाकडे आणि तुझ्याकडे लवकर येईन. त्यासाठी हे दही-साखर तू माझ्या हातावर घालायचं आहेस. घालतोस ना?”            डोळ्यात अक्षरशः पाणी उभं करणारा हा प्रसंग. पण हे पाणी काही फक्त दुःखाचं नाही. तर त्यावेळी मनात उमटणाऱ्या वेगवेगळ्या भावनांचं मिश्रण आहे. खरंतर संपूर्ण पुस्तक वाचतानाच दुःख, यातना, कौतुक, आश्चर्य, भक्ती, आदर अशा अनेक भावना वेळोवेळी मनात दाटून येतात. असं हे अ...

भाग सहा

भाग सहा  तो लॉंग वीकेंड असल्यामुळे इराच्या शाळेला सुट्टी होती. त्याच दरम्यान तिची आजी आल्यामुळे इरा प्रचंड खुश होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती आजीभोवती पिंगा घालू शकत होती. गावातल्या नदीबद्दल, तिथल्या लोकांबद्दल ऐकत किंवा रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकत इरा आजीपाशीच झोपत होती. एरवी एक दिवस जरी सुट्टी असली तरी आईच्या मागे काय करू, कंटाळा आला म्हणत भुणभुण करणारी इरा यावेळी मात्र मजेत होती. त्यामुळे आईही खुश होती. त्यातल्याच एके दिवशी इरा उठली ती आजीच्या अस्वस्थ आवाजामुळेच. खोली बाहेर येऊन बघते तर आजी आपली अखंड या खिडकीतून बघ, त्या खिडकीतून डोकाव करत हॉलमध्ये अस्वस्थ फेऱ्या मारत होती. इराची आई स्वयंपाक घरात नाश्त्याची तयारी करत होती, तर बाबा ऑफिसला जायच्या लगबगीत. त्यातच इराने पाहिलं आजी एकदमच गेट उघडून तरातरा बाहेर गेली. इराला आता प्रचंड उत्सुकता लागली होती. ती आपली आजी यायची वाट बघत खिडकीपाशी उभी राहिली. थोड्या वेळातच आजी परत आली आणि हॉलमध्ये सोफ्यावर टेकली. घरी आली तरी ती शांत मात्र झाली नव्हती. कधी नव्हे ते आई-बाबांना ओरडताना इराने आजीला पाहिलं. 'हे असं रोज रोज होतंय ...

भाग पाच

भाग ५ आजीला बघून इरा प्रचंड खुष झाली होती आणि त्या नादात ती काकडीचा विषयही तात्पुरता विसरून गेली. एका हातात आजीची पर्स आणि दुसऱ्या हाताने आजीला आधार देत इरा तिला आत घेऊन आली.  हाश्य हुश्य करत आजी सोफ्यावर टेकली आणि इराने तिचा ताबाच घेतला. तिच्या मांडीवर हाताची कोपरं टेकवत इराच्या तोंडाची टकळी सुपरफास्ट वेगाने सुरू झाली. इतकी की तिची बडबड ऐकून आजीलाच श्वास घ्यायला दम लागायला लागला. त्यातूनच आजीला तिच्या लेकीची, जावयाची चौकशी करायची होती. पण इरा तिला बोलू देईल तर शप्पथ. पण आजीही शेवटी इराचीच आजी होती. इराशी बोलता बोलता इतरांशीही ती लवकरच गप्पा मारू लागली.  इकडची तिकडची ख्याली खुशाली बद्दल बोलून झाल्यावर एकदमच आजी इराच्या आईला म्हणाली, 'काय गं तुमच्या शहरातल्या नदीची अवस्था! नदी म्हणण्यापेक्षा तिला आता गटार गंगाच म्हणायला हवं बघ. या दोन पाच वर्षात फारच प्रदूषित झालेय की.' आई बाबांच्या बोलण्यातून इरा प्रदूषण, प्रदूषित शब्द ऐकत होतीच. आता आजीही तेच म्हणतेय म्हटल्यावर हे काही भयंकर प्रकरण दिसतंय याची इराला खात्री पटू लागली. आजीला याबद्दल विचारलंच पाहिजे असा ती विचारच करत होती तोवर आ...

भाग चार

भाग चार 'अगं अगं इरा…. ती काकडी आधी धुवून तरी घे की गं. प्रचंड आवडते म्हणून काय न धुता खायची का?' आईचा एकदम तार सप्तकात गेलेला आवाज ऐकून इरा बिचारी थबकलीच. काल आईबरोबर मंडईत गेल्यावर इराला कोवळी, लुसलुशीत काकडी दिसली. काकडी दिसल्यावर ती न घेताच इरा थोडीच येणार…. कच्चं खावं या विचाराची तिची आई असल्यामुळं ती ही नेहमी अशा गोष्टी आवर्जून घेत असतेच. काकडी तर इराची अगदी जीव की प्राण. आई नसती तर इरा तेव्हाच रस्त्याने चालता चालता काकडी खात आली असती. पण सगळ्या गोष्टींना संयम पाहिजे ही आईची शिकवण. घरी आल्यावर आजोबांशी प्लास्टिक संदर्भात गप्पा मारण्यात इरा व्यग्र झाली आणि काकडीचा विषय विसरून गेली. तरी बाहेरून आल्या आल्या हात पाय धुवायची आठवण केली म्हणून बरं, नाहीतर आजोबांना सगळं सांगायच्या उत्साहात ते ही ती विसरून गेली असती.  तर आज सकाळी उठल्यावर इराने फ्रिज उघडला तेव्हा तिला समोर काकडी दिसली आणि इतका वेळ हिला न खाता आपण कसं ठेऊन दिलं या विचाराच्या भरात ती तशीच न धुता तोंडाच्या दिशेने जाऊ लागली होती. पण… पण आईने वेळीच पाहिलं आणि ती इराला ओरडली. 'अगं आई, एवढं काय बिघडलं गं न धुता खाल्ल...

भाग तीन

भाग ३ त्यादिवशी इरा तिच्या आईबरोबर मंडईत भाजी आणायला चालली होती. रस्ताभर इराच्या अखंड गप्पा सुरू होत्या. तिच्या प्रत्येक वाक्याला आई नुसती हं हं म्हणत होती. घरापासून मंडई तशी जवळच होती. इराला भाजी मंडईत यायला फार आवडायचं. टोपलीतले भाज्यांचे ते वेगवेगळे रंग, त्यांचा ताजेपणा पाहताना ती हरखून जायची. त्याचबरोबर भाजी विकणारे काका, मावशी, आजी यांच्याबरोबर गप्पा मारायला तर ती कायम तयारच असायची. त्या सगळ्या मंडळींनाही इराचं फार कौतुक होतं. त्यामुळं ती मंडईत शिरताना दिसली की सगळी खुश व्हायची.  तर त्यादिवशीही इरा मंडईत पोहोचली आणि मगच तिच्या गप्पांना ओहोटी लागली. नीट मांडून ठेवलेल्या भाज्यांकडे ती प्रेमाने पाहू लागली. सगळीकडे नजर टाकत टाकत इरा आईबरोबर तिच्या नेहमीच्या भाजीवाल्या काकांकडे गेली. आई तिला हव्या त्या भाज्या निवडत होती आणि इरा त्याकडे बघत आईशेजारी उभी होती. तिच्या आवडीची भाजी घेताना मात्र इरा उत्साहाने आईला मदत करत होती. सगळी भाजी मापून झाली आणि आईने "किती द्यायचे" विचारत पैसे आणि पिशवी काढायला पर्स उघडली. काकांनी सांगितलेले पैसे त्यांना दिल्यावरही आई पर्सचे कप्पे धुंडाळत अस...

भाग दोन

भाग दोन दिवस भराभर पुढं सरकत होते. तसे इराच्या डोक्यातले विचारही सुपरफास्ट पुढं जात होते. त्या दिवशी बागेत झाड आणि झोपाळा यांच्यातलं बोलणं ऐकल्यावर इराच्या मेंदूत प्रश्नांची गर्दी व्हायला लागली होती. गळ्यात घालायची सोन्याची साखळी तर इराला माहीत होती, पण त्यादिवशी झाड म्हणत होतं ती पर्यावरणाची साखळी कोणती ते तिला माहित नव्हतं. आईकडून त्याची माहिती मिळवायची ठरवून त्या रात्री इरा झोपी गेली होती आणि त्याच वेळी पर्यावरण विषय हिला सोप्या भाषेत कसा समजावून सांगायचा या विचारात आई जागी होती.  बागेतल्या त्या प्रसंगानंतर एक दिवस इरा तिच्या घराभोवतालच्या बागेत खेळत होती. जास्वंद, जाई जुई, गुलाब, प्राजक्त, शेवंती अशा फुलझाडांबरोबरच इतरही दिखाव्याची झाडं इराच्या आजोबांनी आवडीने लावली होती. तिथे खेळता खेळता इरा जुईच्या वेलीपाशी गेली. अचानकच त्यातून एक इवलुशी चिमणी जोरजोरात ओरडत बाहेर आली आणि शेजारी कंपाऊंडच्या भिंतीवर बसून दंगा करायला लागली. आपल्याच तंद्रीत खेळत असलेली इरा चिमणीच्या अनपेक्षित दंग्याने घाबरून घरात पळत गेली. आपली काय चूक झाली हे न कळल्याने ती कावरी बावरी झाली होती. यात महत्त्वाचं ह...

भाग एक

भाग एक त्यादिवशी संध्याकाळी इरा बागेतून घरी आली तीच अगदी गप्प गप्प. रोज भयंकर दंगा करत येणारी, गेटमधूनच आई, आई चा जप करत येणारी इरा, घरी परत आलेली आज आईला कळलंच नाही. इराच्या आजोबांना जेव्हा आत शिरताना पाहिलं तेव्हा आईला कळलं की आज काहीतरी बिनसलेलं दिसतंय. इराचा स्वभाव आईला माहीत होता. अशावेळी काही विचारायला गेलं तर ती उत्तर द्यायची नाही. म्हणून तिला काही न विचारता आईने आजोबांकडे मोर्चा वळवला.  'आज बागेत काही झालं का?' सूनबाईंचा तो प्रश्न ऐकून आजोबा म्हणाले, 'तसं तर काहीच झालं नाही. गेल्या गेल्या घसरगुंडीवर तर मस्त मजेत खेळत होती इरा. मित्र-मैत्रिणींशी नेहमीसारखा दंगा करून झाला. पण नंतर बाकी मंडळी घरी गेली आणि ही झोका घ्यायला गेल्यावर थोड्या वेळाने जरा अस्वस्थ दिसत होती खरं. मी विचारलंही तिला, पण आपल्याच तंद्रीत होती. काहीच बोलली नाही.' सांगेल जरा वेळाने म्हणून आई तिच्या कामाला लागली.  रात्री सगळं आवरून आई जेव्हा झोपायला खोलीत आली तेव्हाही इरा आढ्याकडे बघत गप्प पडली होती. आज जेवतानाही एकदम शांतता होती. इराला तसं पाहून आईच्या मनात थोडीशी कालवाकालव झाली. पण इराकडूनच काही ...

कथा... मायेचा ओलावा

मायेचा ओलावा...           मिनूच्या बाबांची कोकणात बदली झाली आणि एक दिवस मिनू तिच्या आई बाबांसह सामानाच्या ट्रकबरोबर बदलीच्या गावी... वेंगुर्ल्याला येऊन पोहोचली.  कोकण कधी न पाहिलेली मिनू समुद्राच्या गावात राहायला मिळणार म्हणून कधीपासून उड्या मारत होती. त्यात राहणार असलेलं घर पाहून तर ती हुरळूनच गेली. मोठ्ठं आवार, आजूबाजूला थोडी नारळ पोफळीची बाग, अंगणात बरीचशी फुलझाडं, एका बाजूला मालकांचा चौसोपी वाडा आणि त्याला काटकोनात असलेली ही दोन छोटी घरं... या दोन घरांच्या समोर थोडं अंतर राखून असलेली मोठी छान बांधीव विहीर, विहिरीला कायम आपल्या सावलीत ठेवणारं एक ऐसपैस पसरलेलं उंबराचं झाड आणि त्याभोवती बांधलेला पार... या सगळ्यांचं दर्शन होताच मिनू एकदम खुश झाली. मिनूला हे घर आणि परिसर आवडणारच अशी तिच्या बाबांना खात्रीच होती. कारण मिनू अतिशय संवेदनशील मुलगी होती. अगदी लहानपणापासून ती या गोष्टींमध्ये रमत होती. झाडं, पक्षी, फुलपाखरं सगळ्यांबरोबर ती छान गप्पा मारायची. त्यांना कोणी त्रास दिला तर हिला दुखायचं. एकदा शाळेत कोणीतरी पतंगाच्या शेपटीला दोरी बांधून खेळ केला तर मि...

मध्यरात्र

          बघ… तुझ्याबद्दल वाटणारी ही ओढ अजिबात स्वस्थ बसू देत नव्हती मला. हल्ली तर प्रत्येक प्रहर, प्रहरातले प्रत्येक क्षण तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायचे. अगदी आत्ताही बघ ना… मध्यरात्र झाली तरी डोळ्यांवर काही नीज दाटून येत नव्हती. पश्चिमेची गंभीर गाज निवळून आता हळूहळू पूर्वेकडून भूपाळी ऐकू येईल, सप्तर्षींची जागा आता हळूहळू शर्मिष्ठा घ्यायला लागतील; पण माझ्या डोळ्यातली टक्क जाग काही झोपेचं नाव घ्यायला तयार नव्हती. का? तर तू येशील… तू नक्कीच येशील असं वाटायला लावणारी तुझी ओढ. या माझ्या खात्रीला… का?… का म्हणून तडा दिलास रे तू? अर्ध्या तासापूर्वी तुझ्याकडून आलेला मेसेज वाचला आणि… आणि अक्षरशः हादरुन गेले रे. असं का वागलास माझ्याबरोबर सांग ना? झोप येत नव्हती म्हणून गच्चीत बसायला आले होते. पश्चिमेच्या खाऱ्या वाऱ्यासोबत मनाला शांत करणारे सूर ऐकू असं ठरवून वर आले होते रे आणि आता तू सांगतोयस मला की माझं तुझ्याबरोबर नसणं आता स्वीकार. स्वीकार… असं टाईप करण्याएवढं सहज शक्य आहे का ते? अरे, इतके दिवस तुझं अस्तित्व, तुझे श्वास मालकंसच्या सुरां...

वाट पाहताना...

          अगदी पूर्ण मान्य आहे मला की वसंत वैभवाची शान काही आगळीच! वसंताची वाट पाहणारा कोणी नाही असं होऊच शकणार नाही. जादू आहे ती निसर्गाची! रंगांची उधळण करणारा तेव्हाचा निसर्ग खूप साजिरा दिसतो… कोण प्रेमात पडणार नाही त्याच्या? फुलांनी बहरलेला, कीटकांना-पक्ष्यांना आकृष्ट करणारा, सृजनाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारा, एकूणच मोहात पाडणारा असा… असा भोवताल आवडेलच ना सगळ्यांना!… मी ही या भोवतालाच्या प्रेमात आहेच अरे. पण… पण फक्त त्याच प्रेमात अडकलेले नाहीये रे. म्हणूनच तुलाही अडकू देत नाहीये. तू कर ना या वसंतावर प्रेम… फक्त तेव्हा हातातून बाकी काही निसटू देऊ नकोस असं वाटतंय रे. कसं होतं ना कधी कधी… भविष्यातल्या एखाद्या क्षणाची वाट पाहताना वर्तमानातले क्षण हातातून कधी गळून पडतात कळत देखील नाही. म्हणून म्हणतेय…. अडकू नकोस ज्या क्षणाची वाट पाहतोयस फक्त त्या क्षणात… वर्तमानातला क्षण अन् क्षण जगून घे तुला अपेक्षित क्षणाची वाट पाहताना…           जरा या शिशिराकडेही बघ ना तेवढ्याच प्रेमानं. मी कायम म्हणते...

माघ फाल्गुन... शिशिर ऋतू

'हलके हलके हसते गळते तरुचे पान न् पान  बाई, तरुचे पान न् पान पानझडीत या ऐकून घ्या गं शिशिर ऋतूचं गान  बाई, शिशिर ऋतूचं गान!'  वा. रा. कांतांची ही कविता शिशिर ऋतूचं वर्णन किती छान करते! शिशिर ऋतूचं गान हा शब्दप्रयोग फार आवडला मला. गान शब्दामुळं काय वाटलं माहितेय… पुढे येणाऱ्या कोवळ्या पालवीसाठी शिशिर ऋतू डोहाळे गीत गात असेल का? पण शिशिर ऋतूतली पानगळ अनुभवणं ही एक सुंदर गोष्ट आहे. आपण कायम वसंताचं, त्याच्या सौंदर्याचं कौतुक करतो, पण शिशिर देखील तितकाच सुंदर आहे. भले उघड्या बोडक्या झाडांकडे बघून भकास वाटलं तरी त्यातही वेगळं सौंदर्य आहे. मला ना प्रत्येक ऋतूतलं जंगलाचं सौंदर्य अनुभवायची खूप इच्छा आहे. जंगलातला शिशिर ऋतू कसा दिसत असेल ना… पानांचे दागिने काढून ठेवलेली झाडं… त्याखाली वाळलेल्या पानांचा अस्ताव्यस्त पसरलेला पसारा… आणि वातावरणात त्यामुळंच आलेली एक स्तब्धता. श्वासाकडेही दुर्लक्ष करुन ही स्तब्धता अनुभवता यायला हवी. एखाद्या झाडाच्या खरबरीत बुंध्याला टेकून उभं राहावं आणि हा अनुभव घ्यावा… मला वाटतं मी कितीही वेळ या स्तब्धतेशी गुजगोष्टी करु शकेन. शिशिरामधली जंगलातल्या सगळ्...

अलक

          'अगं या बागेतल्या झाडांना, फळाफुलांना आपल्याकडून काही अपेक्षा नसते गं. फक्त आपण त्यांना थोडा वेळ दिला, चांगलं खाऊ-पिऊ घातलं की खुश होतात आणि जास्त छान बहरतात.'            सोफ्यावर बसलेल्या तिच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांनी तिचं फोनवरचं हे बोलणं ऐकलं आणि एकमेकांना नजरेनेच विचारलं... हा समजूतदारपणा ही आपल्या बाबतीत का दाखवत नाही?  *************           राजकारणातली ती व्यक्ती स्वतःची प्रगती भराभर करत होती. पण इतर कोणी त्या व्यक्तीचा वर चढण्यासाठी आधार घ्यायचा प्रयत्न केला तर त्याची मूळं छाटून टाकत होती.            तेव्हाच त्या व्यक्तीच्या बागेतली पोफळी मात्र मिरवेलीला आपल्या अंगाखांद्यावर खेळवत होती. आपल्यातलं खतपाणी तिला देऊन वाढवत होती. मग खरं समजूतदार कोण?  ************           जेवढी भूक असेल तेवढीच शिकार करायची. भुकेपेक्षा जास्त मो...

मार्गशीर्ष पौष... हेमंत ऋतू

शरद ऋतूमधला हवाहवासा वाटणारा गारवा हेमंतात जास्त जोर धरु लागतो आणि थंडीची खरी सुरुवात होते. हेमंत ऋतू… बाकीच्या ऋतूंच्या मानाने याची चर्चा तशी कमीच होते. तसं म्हटलं तर कोणताही बडेजाव न मिरवणारा हा ऋतू... एकदम शांत, साधा, सोज्वळ असा ऋतू… आरोग्यदायी असा ऋतू… खिडकीतून बाहेर दिसणारी धुक्याची दुलई बघत घरात उबदार दुलईत पडून रहावं वाटेल असा ऋतू.  हेमंतातले दिवस छोटे आणि रात्री मोठ्या. संध्याकाळी लवकरच अंधार उंबरा ओलांडून बाहेर पडतो आणि मग जसजशी संध्याकाळ होत जाईल तसा गारवा वाढत जातो. अशा हलक्या गारव्यात फिरायला बाहेर पडण्यात एक मजा असायची. पण या काळात रात्री एकदम थंडगार… रजईमधे अंगाची घडी करुन झोपणं हे सुख वाटायचं लहानपणी. आता थंडीही पूर्वीच्या मानाने कमी झाली आणि झोपही. झोप कमी झाल्याचा फायदा म्हणजे हेमंतातलं पहाटेचं सौंदर्य बघायला मिळतं. सगळीकडे धुकं, धुकं आणि धुकं… अंगात स्वेटर आणि हाताची घडी घालून गल्लीत शांतपणे मारलेल्या फेऱ्या… अहाहा! सगळा परिसर थंडीच्या अमलाखाली स्तब्ध असताना धुक्यातून असं फिरणं आवडतं मला. फिरताना चेहऱ्याला स्पर्श करुन जाणारे ते इटुकले ओलसर कण गोळा करता आले तर किती...

अश्विन कार्तिक... शरद ऋतू

#अश्विन_कार्तिक_शरद_ऋतू  भाद्रपदात बाप्पांचा सहवास काही काळापुरताच असतो खरंतर…पण त्यांना निरोप देऊन आल्यावर थोडं उदासीचं सावट असतं आसपास. नंतर पितरांचं स्मरण करुन झाल्यावर लगेच शरदाच्या चांदण्यानं खुलूनच येतात ते अश्विन कार्तिक. श्रावणातल्या अवखळ वातावरणात खूप सारा बदल होऊन ते आता समंजस, प्रौढ झालेलं जाणवतं. या वातावरणात एक ठेहराव आलेला दिसतो… पाऊसही आपला पसारा आवरुन परतीच्या तयारीला लागतो. काळया ढगांचं रुपपरिवर्तन होऊन ते पांढऱ्या रंगाला आपलंसं करतात. कौलावरून दणदण पडणाऱ्या पागोळ्या आता आपलं अंग आक्रसून घेतात आणि गारव्याची शाल हळूहळू पसरायला लागते. आसपासची हिरवाईसुद्धा आता वयानं प्रौढ होते. हिरव्या रंगाकडून पिवळ्या रंगाकडे तिचा प्रवास सुरु झालेला दिसायला लागतो. पुढचे ऋतू आपली चुणूक हलकेच दाखवायला लागतात. पण तरी भोवताल शरदाच्या येण्यानं नक्कीच आनंदित झालेला दिसतो. पाऊस, ऊन आणि थंडीच्या सीमारेषेवरचा हा शरद ऋतू.  याची सुरुवातच नवरात्रीच्या आगमनानं एकदम प्रसन्न, भक्तिमय होते. नऊ दिवस आदिशक्तीची विविध रुप, अष्टमीचा जागर, घागरीची फुंकर, सवाष्ण, गोडाधोडाचं जेवण याबरोबरच दसऱ्याला झें...

पत्र लेखन २७

शांतता “सोसवेना शांतता कल्लोळ थोडा वाढवा” असं गुरु ठाकूर जरी म्हणत असले ना तरी मला मात्र तूच जवळ हवी वाटायला लागलंय आता. तुझी किती आठवण येतेय म्हणून सांगू! माझ्या इतकं कोणी तुला मिस करत नसेल कदाचित. इतक्या वर्षांची तुझ्या सोबतीची सवय झालेय ना मनाला.. आसपासच्या कल्लोळाला म्यूट करुन फक्त तुझा हात धरुन वावरावं असं वाटतंय आता. पण कसं शक्य आहे ना ते… अगदी मला आठवतंय तेव्हापासून तू माझ्या आसपास आहेसच. लहानपणीचे दिवस तर आपण कोकणातच किती आनंदात घालवले ना! आठवत असेलच तुलाही. तेव्हाचं कोकण तर एकदमच शांत. तिथे सकाळी तू असायचीस तेव्हा तुझ्या बरोबर प्रसन्नताही असायची. दुपारी मात्र वातावरणाप्रमाणं वेगवेगळ्या कोणाला तू सोबत घेऊन यायचीस. बाहेर पाऊस असला तर तुझ्या बरोबर आळस असायचा. ऊन असेल तर तगमग असायची. पण वातावरण कसंही असो तू हवीच. रात्री मात्र…. निरवतेला सोबत घेऊन आलीस की कधी कधी भीती वाटायची अगं. विशेषतः पावसाळ्यात. बाहेर अखंड पाऊस बरसत असायचा, अशा पावसाचं आणि लाईटचं तर भांडणच….मग अंधारात भीती वाटायची. कधी एकदा उजाडतेय असं वाटायचं. पण तेव्हापासून तुझ्या असण्याची सवय झालेय गं.  कोकणात असताना कि...

शिस्त

शिस्त.... कधीकधी पसारा आवरायला घेतला की, कपाटातल्या कप्प्यात सापडतं काय काय… कुठल्याशा मंदिरातली अभिषेकाची पावती… एखाद्या महिन्यातल्या किराणा मालाचं बिल… तर कधी त्याच्याबरोबर गेलेल्या हॉटेलचं बिल… त्या बिलावरचे आकडे पुसट दिसतात हळूहळू  आणि तो ही आता सोबत नसतो…  पण त्याच्या बरोबर घालवलेला सुखाचा काळ… त्याच्या सोबतच्या गुजगोष्टी… त्याच्या सोबत पाहिलेली स्वप्नं… तो आणि त्याच्या आठवणी… त्या तर पुसट होत नाहीत ना कधीच. मग हात आपले शिस्तीत काम करत राहतात पसारा आवरण्याचं…पण मनाचं काय?  मनात पसरलेल्या आठवणींच्या पसाऱ्याचं काय?  कळत नाही त्या आठवणींना शिस्तीत बांधावं, की तसंच राहू द्यावं…पसरलेलं. पुस्तकांचं आवरलेलंच कपाट आवरायला घेतलं की, सापडतं काय काय त्याही कप्प्यात… स्वतःच्या पैशातून घेतलेलं पहिलं पुस्तक… 'सस्नेह‘ लिहून कोणी भेट दिलेलं पुस्तक… लेकीचं एखादं बडबडगीताचं इटुकलं पुस्तक… त्यातच एका पुस्तकावर नजर गेली की, मन हळवं हळवं होऊन जातं. लाडका कवी, त्याचं ते पुस्तक, त्याच्या कविता… पहिल्या पानावरची त्याची झोकदार सही… त्यानं भेट म्हणून दिलेला बुकमार्क… त्यावरचा त्याचा स्पर...

श्रावण भाद्रपद.... वर्षा ऋतू

आषाढ घनांना, आषाढ सरींना शांतवत पुढं येतो तो श्रावण. श्रावण म्हटल्यावर कितीतरी आल्हाददायक गोष्टी डोळ्यासमोरुन पटकन सरकून गेल्या ना! अगदी 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' कसं होतं श्रावणात….तशा. उन्हाची क्षणिक ऊब आठवतेय तोवर पावसाच्या रिमझिम सरीत भिजायला झालं. मागोमाग इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात सूर मिसळतोय तोवर हिरवागार सभोवताल मिंड घ्यायला लावतो. आकाशातली वेगवेगळ्या रंगांची मस्ती बघतोय तोवर पायाला तृणपाती हळूच गुदगुल्या करून लक्ष वेधून घेतात. नजर कुठेही फिरवली तरी हिरवाईच्या छटा नजरेत भरणारच. काळे कबरे दगड देखील हिरव्या मऊशार शेवाळाने नटून मिरवायला लागतात. डोंगर बिंगर, दऱ्या खोऱ्या सगळं सगळं हिरवंगार…आणि अशा या नटलेल्या सृष्टीवर कधी सोनसळी उन्हाचा शेक तर क्षणात गुलाबदाणीतून शिंपडणारा पाऊस…हा श्रावणाचा अवखळपणाच म्हणायला हवा. पण श्रावणाचा साज काही निराळाच… मोहित करणारा.   श्रावणाचं सौंदर्य खुलवणारा खरा दागिना कोणता माहितेय…..या काळात फुलणारी इवली इवली, विविधरंगी रानफुलं. श्रावणातल्या वर्षा ऋतूची ही ओळख. आषाढातल्या कोसळणाऱ्या पावसाला दबकून असणारी ही नाजूक फुलं श्राव...